
काँग्रेसकडून मिरजेला वारंवार डावलले जात असल्याची भावना मिरजेच्या जनतेत होती. त्यामुळे सर्व काँग्रेसविरोधी पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेसला धक्का द्यायचाच असे ठरविले. मात्र, उमेदवार कोण? असा प्रश्न त्यावेळी उपस्थित झाला.
सांगली : गेल्या १९६० ते ७० च्या दशकात सांगली आणि दक्षिण महाराष्ट्र परिसरात वसंतदादा पाटलांचे वर्चस्व होते. यशवंतराव चव्हाणांच्या खांद्याला खांदा लावून राजकारण करणारे महान लोकनेता म्हणून त्यांची ओळख होती. त्याकाळी वसंतदादांच्या विरोधात कोणीही उमेदवार द्यायचे धाडस करत नव्हते. मात्र, त्याकाळी प्रत्येक आठवडी बाजारात स्टूल टाकून रुग्ण तपासणाऱ्या एका डॉक्टरने वसंतदादा पाटलांच्या विरोधात जाण्याचे धाडस केले आणि मिरजेच्या जनतेनी त्यांना निवडून देखील दिले. त्याकाळी हा वसंतदादा पाटलांचा सर्वात मोठा पराभव मानला जात होता.
काँग्रेसविरोधी मिरज -
वसंतदादा पाटील यांची दिल्ली ते गल्ली अशी ओळख होती. राज्याच्या राजकारणात वसंतदादा पाटलांचे वर्चस्व होते. ते पदमाळ गावचे होते. ते गाव सांगलीच्या जवळ होते. त्यामुळे दादा नेहमी सांगलीला जवळ करतात आणि मिरजेला दुय्यम लेखतात, अशी मिरजेच्या जनतेची भावना होती. तसेच मिरजेला रेल्वे होती. सांगलीला रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणायचे, अशी वसंतदादा पाटलांचे स्वप्न होते. मिरजेमध्ये रेल्वेचे जंक्शन आहे. त्यावरच मिरजेची आर्थिक घडी बसलेली आहे. मात्र, वसंतदादा पाटील हे रेल्वे जंक्शन सांगलीला नेणार असल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे काँग्रेसकडून मिरजेला वारंवार डावलले जात असल्याची भावना मिरजेच्या जनतेत होती. त्यामुळे सर्व काँग्रेसविरोधी पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेसला धक्का द्यायचाच असे ठरविले. मात्र, उमेदवार कोण? असा प्रश्न त्यावेळी उपस्थित झाला. त्यावेळी डॉ. नरसिंह पाठक या सेवाभावी डॉक्टरांचे नाव समोर आले.
हेही वाचा - शेतकरी दिवस : चौधरी चरणसिंह केवळ सहा महिने पंतप्रधान...
डॉ. पाठक मूळचे मिरजेचे रहिवासी होते. मिरज हे मेडीकल हब होते. डॉ. गायकवाड, डॉ. वॉनलेस, डॉ. पाठक, डॉ. गोसावी, डॉ. मजरेलो हे त्याकाळी गाजलेले डॉक्टर होते. त्यापैकी डॉ. नरसिंह पाठक अत्यंत सेवाभावी होते. ते दर आठवडी बाजारात जायचे. पण ते खरेदीसाठी नाही, तर रुग्णांची सेवा करण्यासाठी. आठवड्यात जवळपास ५ ठिकाणी बाजार भरायचा. डॉ. पाठक हे गाडीच्या डिक्कीत औषधांसह वैद्यकीय साहित्य भरायचे अन् बाजारात जात होते. बाजारात स्टूल टाकून रुग्णांना तपासायचे, ते देखील एकही रुपया न घेता. त्यामुळे त्यांच्याविषयी जनतेच्या मनात प्रचंड आदरभाव होता. ते शस्त्रक्रिया विशारद होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक रुग्ण त्यांच्याकडे शस्त्रक्रिया करण्यासाठी यायचे. एकदा माजी पंतप्रधान चंद्रशेखर देखील त्यांच्याकडे उपचारासाठी आले होते. डॉ. पाठक यांचा शस्त्रक्रियेमध्ये हातखंड होता. तसेच त्यांची सेवाभावी वृत्ती पाहून जनता त्यांच्यावर खुश होती. त्यामुळे सर्व काँग्रेसविरोधी पक्षांनी डॉ. पाठक यांना निवडणुकीत उभे करायचे ठरविले.
१९६७ च्या निवडणुकीत डॉ. पाठक यांचा फक्त ३ हजार मतांनी पराभव झाला. त्याचवेळी मिरजेचा आपल्याला किती विरोध आहे, हे वसंतदादा पाटलांना समजले असावे. पराभूत झाल्यावरही डॉ. पाटील यांची सेवाकार्य सुरूच होते.
हेही वाचा - राज्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने संपविले जीवन, तिघांविरुद्ध गुन्हा
१९७२ च्या निवडणुकीत डॉ. पाठक यांच्या पथ्थ्यावर पडलेले मुद्दे -
हे सर्व मुद्दे डॉ. पाठक यांच्या पथ्थ्यावर पडले आणि बहुमताने डॉ. पाठक आमदार झाले. वसंतदादा पाटील यांचे प्रस्थ असलेल्या भागातून डॉ. पाठक बहुमताने निवडून आले होते. त्यामुळे हा वसंतदादा पाटलांना मोठा धक्का मानला जात होता.
संपादन - भाग्यश्री राऊत