सरकारकडून 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थितीची घोषणा

सरकारकडून 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थितीची घोषणा

मुंबई : राज्य सरकारकडून दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा करण्यात आली आहे. 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा करण्यात आली आहे. सरकार आता यानुसार उपाययोजना करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. दुष्काळसदृश परिस्थितीशी सामना करण्यासाठी एकूण आठ उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

केंद्र सरकारची टीम लवकरच महाराष्ट्रात दाखल होऊन पाहणी करणार आहे. त्यानंतर मदतीची घोषणा करण्यात येईल. राज्य सरकारच्या अखत्यारित दुष्काळ घोषित करणे आणि उपाययोजना राबवणे असल्याने आम्ही ते केले आहे असे फडणवीस यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी चारा छावण्याची वेळ अद्याप आलेली नाही आणि ती येणार नाही असेही सांगितले.

12 लाख शेतकरी राहणार वंचित
मॉन्सूनच्या प्रारंभी सर्वत्र चांगला पाऊस झाला. एक कोटी 39 लाख 40 हजार 311 हेक्‍टरपैकी सुमारे 89 लाख हेक्‍टरवर पेरणी झाली होती. तसेच, एक कोटी 91 लाख 105 हेक्‍टर उसाच्या क्षेत्रापैकी 64 टक्‍के क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली. परंतु, पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांची वाढ खुंटली व बहुतांशी पिके वाया गेली. मात्र, सुरवातीच्या काळातील माहितीचा विचार दुष्काळी मदतीसाठी केला जातो. सध्या पाण्याची पातळी घटली असली तरीही ऑक्‍टोबरची पाणीपातळी गृहीत धरली जाते. या सर्व निकषांमुळे राज्यातील 11 ते 12 लाख शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित राहतील, असा अंदाज सूत्रांकडून व्यक्‍त करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com