

ई-बसेसना टोलमाफीमुळे प्रवास तब्बल एक तासाने लवकर होणार.
esakal
E Buses Get Toll Exemption : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसेसना राज्यातील द्रुतगती महामार्गांवर 100 टक्के टोलमाफी देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत विशेष प्रयत्न केल्याने यश आले आहे. दरम्यान भूजबळ यांच्या नाशिक जिल्ह्याला याचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे मुंबई -नाशिक महामार्गावर धावणाऱ्या ई -बसेसना आता टोलमाफी मिळणार आहे. याचबरोबर प्रवाशांचा तब्बल १ तास वाचणार आहे.