ऊर्जामंत्र्यांची घोषणा! वीज कनेक्‍शन तोडणी थांबविण्याचे आदेश

अधिवेशनातील विरोधकांची आक्रमक मागणी, 'सकाळ'चा पाठपुरावा आणि सत्ताधारी महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधींच्या मागणीला आज अखेर यश आले असून वीज कनेक्‍शन तोडणी तत्काळ थांबावावी, असे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नुकतेच दिले.
डॉ. नितीन राऊत
डॉ. नितीन राऊतsakal

सोलापूर : राज्यातील शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढत असतानाच महावितरणने शेतकऱ्यांचे वीज कनेक्‍शन तोडण्याची मोहीम सुरु केली होती. मागील महिनाभरात तब्बल दीड लाखांहून अधिक ग्राहकांचे वीज कनेक्‍शन तोडले गेले आहे. आता ज्यांनी वीज बिल भरले नाही, त्यांचे कनेक्‍शन तोडणे सुरु होते. पण, अधिवेशनातील विरोधकांची आक्रमक मागणी, 'सकाळ'चा पाठपुरावा आणि सत्ताधारी महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधींच्या मागणीला आज अखेर यश आले असून वीज कनेक्‍शन तोडणी तत्काळ थांबावावी, असे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नुकतेच दिले.

डॉ. नितीन राऊत
राज्यातील 22 लाख शेतकऱ्यांना वीजेची अंदाजे बिलं! दहा ते 50 हजार भरण्याची अट

राज्यात उसाचे अतिरिक्‍त उत्पादन झाल्याने अजूनही शेतकऱ्यांच्या शेतात ऊस उभा आहे. शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी दिली जात नाही. शेतीमालाचे दर गडगडले असून खासगी सावकारांकडून घेतले जाणारे कर्ज वाढू लागले आहे. दरमहा राज्यात दोन हजारांहून अधिक शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. पंढरपूर तालुक्‍यातील सुरज जाधव या युवकाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्याचे पडसाद अधिवेशनात उमटले. त्यामुळे कॉंग्रेसकडे ऊर्जा खाते असतानाही कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वीज कनेक्‍शन तोडणी थांबवावी, अशी मागणी केली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून वीज तोडणी थांबविण्यासंदर्भात आक्रमक पवित्रा घेतला होता. शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांच्यासमोर जगावे की मरावे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत वीज कनेक्‍शन तोडणी थांबविणेच योग्य राहील म्हणून ऊर्जामंत्र्यांनी वीज कनेक्‍शन तोडणी थांबविण्याचे आदेश दिले आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना लगेचच सूचना देऊन कनेक्‍शन तोडणी थांबविली आहे.

डॉ. नितीन राऊत
पुन्हा खोटेच आश्‍वासन! हप्ते पाडण्याचा आदेश नसल्याने शेतीपंपाचे वीज कनेक्‍शन तोडणी सुरुच
  • ठळक बाबी...
    - कडक उन्हाळा अन्‌ शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन वीज कनेक्‍शन तोडणी थांबविण्याचे आदेश
    - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही केली होती तशी मागणी
    - राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांपैकी 42 लाख शेतकऱ्यांकडे तब्बल 40 हजार कोटींची थकबाकी
    - शेतकऱ्यांनी तीन महिन्याला येणाऱ्या बिलाची रक्‍कम वेळेत भरण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आवाहन
    - पॉवरलूम व टेक्‍स्टाईल उद्योगांना मिळणार वीजेची सबसिडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com