७३ लाख शेतकऱ्यांनी भरला पीकविमा! शेतकऱ्यांनी भरला ४२७ कोटींचा हिस्सा; ‘या’ २३ जिल्ह्यातील ५० टक्के शेतकऱ्यांनी भरला नाही विमा, विमा भरण्यासाठी मुदतवाढ

यंदा ३१ जुलैपर्यंतच्या मुदतीत ७२ लाख ३७ हजार शेतकऱ्यांनीच अर्ज केले आहेत. त्या शेतकऱ्यांना ४२७ कोटी मोजावे लागले आहेत. विशेष म्हणजे २३ जिल्ह्यांमधील ५० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी अडचणींमुळे पीकविमाच भरला नसल्याची बाब समोर आली आहे.
solapur sakal news
Mantralay maharashtrasakal media
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ‘एक रुपयात पीकविमा’ सुरू केली आणि पहिल्याच वर्षी राज्यातील एक कोटी ६८ लाख शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी अर्ज केले. योजनेमुळे शेतकऱ्यांना अवघे एक कोटी ६८ लाख रुपयेच भरावे लागले होते. मात्र, राज्य सरकारने एक रुपयात पीकविमा योजना बंद केल्याने यंदा ३१ जुलैपर्यंतच्या मुदतीत ७२ लाख ३७ हजार शेतकऱ्यांनीच अर्ज केले आहेत. त्या शेतकऱ्यांना ४२७ कोटी मोजावे लागले आहेत. विशेष म्हणजे २३ जिल्ह्यांमधील ५० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी अडचणींमुळे पीकविमाच भरला नसल्याची बाब समोर आली आहे.

राज्यातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, अहिल्यानगर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या २३ जिल्ह्यांमधून शेतकऱ्यांचे ५० टक्क्यापेक्षा कमी अर्ज आहेत. राज्यातील ७९ लाख शेतकऱ्यांकडे बॅंकांचे कर्ज आहे, पण त्यातील एक लाख ७० हजार कर्जदार शेतकऱ्यांनीच खरीप पीकविमा भरला आहे.

राज्यातील ७३ लाख शेतकऱ्यांनी ४६ लाख हेक्टरवरील पिकांसाठी विमा हप्ता भरला आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी भरलेला विमा हप्ता ४२७ कोटी १९ लाख रुपये आणि केंद्र व राज्य सरकारकडून (प्रत्येकी ७५८.९१ कोटी) मिळालेली रक्कम १,९४५ कोटी आहे. कृषी विभागाला ६४ लाखांपर्यंतच अर्ज अपेक्षित होते, पण अर्जासाठी ‘फार्मर आयडी’ची अट असताना देखील ७३ लाखांपर्यंत शेतकऱ्यांनी विमा भरला आहे. ज्या शेतकऱ्यांनी मुदतीत पीकविमा भरला नाही, त्यांच्यासाठी आठ ते दहा दिवसांची मुदतवाढ असेल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

विभागनिहाय पीकविम्याची स्थिती

  • विभाग अर्जदार शेतकरी भरलेला हिस्सा

  • कोकण ७६,५८५ १.३८ कोटी

  • नाशिक ६,२१,२८१ २४.७१ कोटी

  • पुणे ५,३७,४१९ ३०.५० कोटी

  • कोल्हापूर १,२८,०२० १.०९ कोटी

  • छ.संभाजी नगर २०,०६,०९३ १०१.१४ कोटी

  • लातूर २४,५९,४०० १७९.५१ कोटी

  • अमरावती ११,४७,२९२ ७४.६२ कोटी

  • नागपूर २,६१,५६० १४.२५ कोटी

  • एकूण ७२,३७,६५० ४२७.१९ कोटी

बॅंकांनी भरला पावणेदोन लाख शेतकऱ्यांचा पीकविमा

खरीप पीकविमा योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत होती. या मुदतीत राज्यातील ७२ लाख ३७ हजार ६५० शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी अर्ज केले आहेत. कर्जदार शेतकऱ्याने खरीप पिकांचा विमा भरला नाही आणि पीक नैसर्गिक आपत्तीत वाया गेल्यास बॅंकेचे कर्ज थकबाकीत जाईल म्हणून एक लाख ७० हजार ११८ शेतकऱ्यांचा पीकविमा बॅंकांनी भरला आहे. पूर्वी बॅंका त्यांच्याकडील सर्वच कर्जदार शेतकऱ्यांचा पीकविमा भरत होते, पण यंदा शेतकऱ्यांच्या संमतीने बॅंकांनीच विमा हप्ता भरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com