
Farmers Long March: शेतकऱ्यांना दिलासा नाहीच; शिष्टमंडळासोबत होणारी बैठक पुढे ढकलली, काय कारण?
शेतकरी नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात लॉंग मोर्च्यावर तोडगा काढण्यासाठी आज बैठक होणार होती. मात्र ही बैठक आज रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांवर आजही तोडगा नाही. (Farmers Long March meeting postponed Cm Eknath Shinde Devendra Fadnavis )
युती सरकारच्या काळात म्हणजे २०१७ साली शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी अभूतपूर्व मोर्चा काढला होता. या मोर्च्यात राज्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. या घटनेला आता पाच ते सहा वर्ष होत झाले आहेत.
Old Pension Scheme: संपात सहभागी होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा?
आता पुन्हा एकदा बळीराजा आक्रमक झाला असून, लाल वादळ पुन्हा एकदा मुंबईत धडकणार आहे. कांद्याचा भाव, वीज माफी, अवकाळी पावसामुळे (Rain) नुकसान या सगळ्या त्रासामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे वारंवार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.
याप्रकरणी आज बैठक होणार होती. मात्र, ही बैठक रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय सहसचिव, अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी दिली आहे. अचानक राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनीही संप पुकारल्याने शेतकऱ्यांची ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, शेतकरी नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात या लॉंग मोर्च्यावर तोडगा काढण्यासाठी आज बैठक होणार होती, मात्र ही बैठक आज रद्द करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय सहसचिव, अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी सांगितली आहे.
Shivsena : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! ठाकरे गटाची शाखा पूर्णपणे शिंदेंच्या शिवसेनेत होणार विलीन
तसेच आज होणारी बैठक पुन्हा कधी होणार याबाबत काही माहिती कळवली नसल्याचं देखील त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, आजची बैठक उद्या होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?
नाशिकच्या दिंडोरी येथून या लॉंगमार्चला सुरवात झाली आहे. नाशिक-मुंबई असा लॉन्ग मार्च काढण्यात आला आहे. या लॉंगमार्च मध्ये कष्टकरी, कामगार, शेतकरी सर्व रस्त्यामध्ये भेटत असून सहभागी होत आहेत. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी कांदा दरावरून रस्त्यावर कांदा फेकत आंदोलनही केले आहे.
या मोर्चाच्या माध्यमातून वन जमिनीचा प्रश्न आहे, शेतकरी कसत असलेली वन जमीन आदिवासी शेतकऱ्यांच्या नावावर करावी, सातबारा कोरा करावा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले पाहिजे, सोयाबीन कांद्यासह सर्व शेतीमालांना भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे, आदी मागण्यांसाठी हा लॉन्ग मार्च काढण्यात आला आहे. त्यामुळं सुरक्षेबाबत पोलिसांनी मोठा फौजफाट तैनात केला आहे.