शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार महिना अखेरपर्यंत

Balasaheb-Patil
Balasaheb-Patil

मुंबई - महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून जुलै अखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळेल, असे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. या योजनेची अंमलबजावणी सुरू असताना कोरोनाव्हायरसचे संकट आले. त्यामुळे राज्यामध्ये लॉकडाउन जाहीर झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या नियमांमुळे योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या आणि तिसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास उशीर झाला. 

आता ही प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी दोन हजार कोटी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. जुलै अखेरपर्यंत सव्वा ११ लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ८ हजार २०० कोटी रुपये रक्कम वर्ग करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

सहकार मंत्र्यांच्या सूचना

  • योजनेचा लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी
  • कोरोनामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या कर्जदार शेतकऱ्यांना बँकांनी खरीप कर्ज द्यावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com