Yogi Adityanath vs Jitendra Awhad: राजस्थानमधील जालोर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक वक्तव्य केलं होतं. अयोध्येतील श्रीराम मंदिराचा संदर्भ देत ते म्हणाले, "आमच्या धार्मिक स्थळांची कोणत्याही काळात विटंबना झाली असेल, तर त्याच्या जीर्णोद्धारासाठी मोहीम सुरू केली पाहिजे.
आपला सनातन धर्म हाच भारताचा राष्ट्र धर्म आहे हे आता सर्वांनी मान्य केलं पाहिजे." योगीच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी योगींवर हल्लाबोल केला आहे.
सनातन धर्माची स्थापना म्हणजे परत एकदा अस्पृश्यता समाजात जन्माला येईल.अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.
आव्हाड यांनी ट्विट करून योगीवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की,"उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे जाहीरपणे बोलले कि सनातन धर्म हाच भारताचा खरा धर्म आहे.
एवढे वर्षे आम्ही हेच सांगत होतो कि, ज्या दिवशी ह्यांना वाटेल कि भारताची संपूर्ण सत्ता आपल्या ताब्यात येतेय, त्यादिवशी हे सनातन धर्माबद्दल बोलायला लागतील.
सनातन धर्माची स्थापना म्हणजे परत एकदा अस्पृश्यता समाजात रुजवून वर्णव्यवस्थेचा निर्माण होणं आणि परत एकदा बहुजन वर्गाला शिक्षणापासून दूर ठेवणे.जो सनातन धर्म गेली 5 हजार वर्षे ह्या भारताचे बट्याबोळ करून गेला.
त्या सनातन धर्माविरुद्ध आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबपर्यंत उभे राहू."
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.