'पूरसंरक्षणासाठी नदी काठावर भिंत शक्य नाही'

विरोध पक्ष नेते देवेंद्र फडणवीस - केंद्रीय मंत्री राणेंची पडणवीस यांनी केली पाठराखण
'पूरसंरक्षणासाठी नदी काठावर भिंत शक्य नाही'

कोल्हापूर : नदीकाठावर पूरसंरक्षण भिंत ही काय चीनच्या भिंती सारखी सरसकट बांधता येत नाही. अनेक पर्यांयांपैकी हा एक असू शकेल पण ती सरसकट बांधता येऊ शकत नाही. (Kolhapur tour) माझ्या ज्ञानाप्रमाणे पूरसंरक्षण भिंती घालणे सरसकट शक्य होणार नाही, असे मत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. एका प्रश्‍नावर त्यांनी हे उत्तर दिले.

विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक यांनी आज शहरातील (pravin darekar) पाहणी केली. यानंतर फडणवीस यांनी दुपारी पत्रकार परिषद घेवून काही मुद्यांची माहिती दिली.

'पूरसंरक्षणासाठी नदी काठावर भिंत शक्य नाही'
ठाकरे सरकारकडून अजूनही पूरग्रस्तांना मदत नाही: देवेंद्र फडणवीस

महापूरापासून (kolhapur flood) संरक्षण करण्यासाठी पूरसंरक्षण भिती घालण्याचा विचार शासन करीत आहे. त्यावर आपले मत काय या प्रश्‍नावर ते फडणवीस म्हणाले, 'पूरसंरक्षण भिंत हा काय उपाय होऊ शकत नाही. चीनच्या भिंती सारखी सरसकट भिंत बांधता येणे शक्य नाही. ज्यांनी हा मुद्दा उपस्थित केला असेल त्यांनी त्याचा अभ्यास केला असेल, पण माझ्या ज्ञाना प्रमाणे हा काय पर्याय होऊ शकत नाही. पूरसंरक्षणासाठी अनेक पर्याय पुढे येतात त्या पैकी हा एक असू शकतो. तोही ठराविक भागा पुरता, पण सरसकट भिंती बांधणे योग्य होणार नाही. यावर सरकार अभ्यास करेल.'

अतिक्रमण आणि पूरबाधित भागातील बांधकामे या प्रश्‍नावर फडणवीस म्हणाले, 'सध्या वीस वर्षापूर्वीची सरसकट बांधकामे आत्ता काढणे शक्य नाही. त्यामुळे आहे त्या परिस्थिती काय उपाय योजना करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. सध्या ती बांधकाम काढता येणे शक्य नाही. ती काढणे उचित होणार नाही. २००५, २०१९ आणि आजची पश्‍चिम महाराष्ट्राची परिस्थिती पाहता आता कायमस्वरुपी उपाय योजना करणे महत्वाचे ठरणार आहे. पाऊस कमी कालावधीत अधिक होत आहे. त्यामुळे सध्या तातडीने मदत देणे आणि कायम स्वरुपांचा उपाय करणे आवश्‍यक आहे. दौऱ्यात मुख्यमंत्री आणि मी भेटलो तेव्हा ही आम्ही फारच कमी वेळात हाच मुद्दा बोललो. लवकरच ते बैठक बोलवणार आहेत. त्यामध्ये आम्हीही सहभागी होणार असून तेथे कायमस्वरुपी उपायांवर चर्चा होणार आहे. ‘‘

'पूरसंरक्षणासाठी नदी काठावर भिंत शक्य नाही'
Photo: CM उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात आमनेसामने

केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी रत्नागिरी दौऱ्यात अधिकाऱ्यांना झापले यावर तुमचे मत काय या प्रश्‍नावर फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पाठराखण केली. ते म्हणाले, 'जेव्हा मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री एकाच दौऱ्यावर असतात तेव्हा जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांकडे असल्यास अपर जिल्ह्याधिकारी केंद्रीय मंत्र्यांकडे पाहिजेत. मात्र रत्नागिरी दौऱ्यात (ratnagiri) असे झाले नाही. मुळात मुख्यमंत्री यांचा दौरा संपल्यानंतर ते तेथे पोचले होते. यावेळी लोकांचा आक्रोश होता. काही अधिकारी तहसिल कार्यालयात बसले होते. मात्र केंद्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून तेथे गेलेल्या केंद्रीय मंत्र्यांसोबत गेले नाहीत. हा त्यातील खरा मुद्दा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com