आमदारांचा पाठपुरावा, ‘जलसंपदा’ची‌ धडपड अन्‌ शेतकऱ्यांना २५ वर्षानंतर पाणी! ‘एकरूख’सह लांबोटी वितरिका, माढ्यातील गावांना पहिल्यांदाच दिलासा

अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या एकरूख योजनेतून यंदा पहिल्यांदाच पाणी वाहिले. लांबोटी वितरिकेतील शिरापूर, आष्टे, मलकाची हिंगणी, भांबेवाडी या भागालाही प्रथमच पाणी आले. धरणापासून 3-4 किमी अंतरावरील पाच नंबर मायनर कॅनॉललाही यंदा पहिल्यांदाच पाणी आले होते.
solapur ujani dam
solapur ujani damsakal

सोलापूर : अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या एकरूख योजनेतून यंदा पहिल्यांदाच पाणी वाहिले. लांबोटी वितरिकेतील शिरापूर, आष्टे, मलकाची हिंगणी, भांबेवाडी या भागालाही प्रथमच पाणी आले. धरणापासून अगदी तीन-चार किमी अंतरावरील पाच नंबर मायनर कॅनॉललाही यंदा पहिल्यांदाच पाणी आले होते. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे विशेष लक्ष व यांत्रिकीकरण विभागाच्या धडपडीमुळे २२ ते २५ वर्षानंतर पहिल्यांदाच त्या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

उजनी धरणाचा सोलापूर शहर- जिल्ह्यासह पुणे, धाराशिव, कर्जत-जामखेड या शहरांनाही मोठा आधार आहे. अनेक औद्योगिक वसाहतींनाही उजनीतूनच पाणीपुरवठा होतो. उजनी धरणाचे काम सुरू असतानाच डावा व उजवा कालवाही तयार झाला. त्यानंतर विविध उपसा सिंचन योजना, मुख्य कालव्यांवरील उपशाखा व बोगद्यांचीही कामे झाली. मात्र, २० ते २५ वर्षांपासून काही उपशाखा किंवा वितरिकांना पाणी जाणे बंद झाले होते.

छोट्या कॅनॉलमधील काटेरी झुडपे, गाळ, अशा अडथळ्यांमुळे हजारो शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे पाण्याची वाट पाहावी लागत होती. पण, अधीक्षक अभियंता धीरज साळे व ज्ञानेश्वर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली यांत्रिकी विभागाने अनेक ठिकाणचा गाळ काढला. त्यामुळे शेकडो गावांमधील शेतकऱ्यांना अनेक वर्षानंतर त्या छोट्या कॅनॉलला पाणी पाहायला मिळाले. यांत्रिकी विभागाने २६ ते ३० लाखांत ही कामे पूर्ण केली आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोच केले. गाळ किंवा अडथळे काढल्याने आवर्तनाचे दिवस देखील कमी झाले असून आता यापुढे त्या भागाला प्रत्येकवेळी पाणी मिळणार आहे.

‘या’ आमदारांचा यशस्वी पाठपुरावा

अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पाठपुराव्यातून एकरूख योजनेतून यंदा पहिल्यांदाच दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील जवळपास ७२ गावांना उजनीचे पाणी मिळाले. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्यातून उजनी धरणापासून तीन ते चार किमी अंतरावरील पाच नंबर मायनरलाही २३ वर्षानंतर पहिल्यांदाच पाणी सोडण्यात आले. दुसरीकडे लांबोटी वितरिकेच्या ३२ किमीपैकी शेवटच्या १२ किमीपर्यंत पाणीच जात नव्हते. पण, आमदार यशवंत माने यांच्या प्रयत्नातून शिरापूर, आष्टे, भांबेवाडी, मलकाची हिंगणी या गावापर्यंत उजनीचे पाणी पोचले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com