चारशे आक्षेपार्ह पोस्ट रडारवर

Social-Media
Social-Media

राज्यात ९१ हजार जणांवर कारवाई; ६० कोटींची रोकड, दारू जप्त
मुंबई - निवडणुकांच्या काळात समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात अफवांचे पीक उगवते. अशा ‘फेक न्यूज’, अफवा व ४०० प्रक्षोभक पोस्ट राज्य सायबर विभागाच्या रडारवर आल्या असून, त्यांची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राज्यभरात ९१ हजार ५६१ जणांवर कारवाई करण्यात आली असून, ६० कोटी रुपये, अमली पदार्थ व मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

बदलत्या काळानुसार निवडणुकाही ‘हायटेक’ झाल्या आहेत. रस्त्यावरील प्रचाराप्रमाणे समाजमाध्यमांवरही प्रतिस्पर्धी उमेदवार, पक्षांवर जोरदार टीका केली जाते; तसेच खोट्या बातम्याही पसरवल्या जातात. 

प्रक्षोभक पोस्टद्वारे समाजांत द्वेषाला चिथावणी दिली जाते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्‌भवू शकतो. अशा प्रकारांना चाप लावण्यासाठी निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर २१ सप्टेंबरला महाराष्ट्र सायबर विभागाने तयार केलेले ४० अधिकाऱ्यांचे विशेष पथक आक्षेपार्ह पोस्टवर लक्ष ठेवून आहे. अफवा, ‘फेक न्यूज’, सुमारे ४०० प्रक्षोभक पोस्ट व व्हिडिओ यांची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. 

सर्वाधिक आक्षेपार्ह मजकूर फेसबुक आणि ट्विटरवर असल्याचे समोर आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com