

Ganesh Naik Eknath Shinde navi mumbai controversy
esakal
Maharashtra Politics : राज्यात धर्म, जात आणि विविध प्रश्नांवरून आंदोलने सुरू असताना वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ‘काही लोकांनी लावलेल्या आगी आता विझत नाहीत. बाटलीतली भूतं बाहेर काढल्याने ती आता अंगाशी येत आहेत. त्यामुळे काढलेली भुतं पुन्हा बंद करण्याची ताकद ज्याच्यात असेल, त्यांनीच ती बाहेर काढावीत,’ अशी खोचक टीका नाईक यांनी केली.