मुंबई - ‘महाराष्ट्रात सध्या कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये ८० टक्के रुग्ण लक्षणविरहीत आहेत; तर १५ टक्के मध्यम स्वरूपाचे आणि पाच टक्के गंभीर स्वरूपाचे रुग्ण आहेत. राज्याचा मृत्यूदर ३.३ टक्के असून तो कमी करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारपुढे आहे,’’ अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील ‘कोरोनाशी दोन हात’ या मुलाखतीत टोपे बोलत होते. सोमवारी (ता.७) सप्टेंबरपर्यंत दररोज रात्री ९ वाजता ही मुलाखत सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. टोपे म्हणाले, ‘‘संसर्गजन्य आजारामध्ये प्रतिकारशक्ती हा महत्त्वाचा घटक असून प्रत्येकाने आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवणे गरजेचे आहे. एका कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीला संसर्ग होतो आणि इतरांना होत नाही म्हणजे इतरांची प्रतिकारशक्ती चांगली असते. ज्यांना लक्षणे नाहीत, म्हणजे थोडाफार विषाणू संसर्ग त्यांच्या शरीरामध्ये असेल, परंतु त्या रुग्णाच्या शरीरातील `न्युट्रिलायजिंग अँण्टीबॉडीज’ने त्या विषाणूला मारलेही असेल.
कोरोनाच्या चाचण्यांबाबत.आरोग्यमंत्री म्हणाले...
Edited By - Prashant Patil
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.