Tourists Stopped Over Mangoes
esakal
गुहागर : राज्य संरक्षित स्मारक अशी अधिकृत नोंद असूनही, ऐतिहासिक ‘गोपाळगड’ किल्ल्याच्या सातबाऱ्यावर काही खासगी व्यक्तींची नावे आल्यामुळे गुहागरात वाद निर्माण झाला आहे. संबधित खातेदारांनी पर्यटकांना ‘आम्हीच गडाचे मालक आहोत’ असे सांगत हुसकावून लावल्याचा प्रकार नुकताच घडला. या पार्श्वभूमीवर, गोपाळगड किल्ला तातडीने पूर्णपणे शासनाच्या ताब्यात घ्यावा, अशी मागणी गुहागर पंचायत समितीचे उपसभापती नीलेश सुर्वे, आमदार प्रमोद जठार यांच्याकडे पत्राद्वारे केली.