

Ancient Mankala Game Found In Raigad
ESakal
मुंबई : कोकणात १७५ गावांत दोन हजारांहून अधिक कातळशिल्पे आहेत. या कातळशिल्पांचे गूढ शाेधून काढण्यासाठी यावर आता संशोधन केले जाणार असून यासाठी राज्य सरकारने १४ कोटी ६२ लाख रुपयांची तरतूद केली आहे. या संशोधनासाठी मुंबई आणि रत्नागिरी येथील जागतिक वारसा कक्ष निर्माण केला जाणार आहे. या वारसाकक्षाच्या माध्यमातून कोकणातील कातळशिल्पाविषयीचे संशोधन, नवीन स्थळांचा शोध आणि कातळशिल्पांचे दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे.