

हिंगोली: स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अभिजित दीपके यांनी शनिवारी (ता. १५) राज्यभरात ‘सरकारी स्कूल ठीक करो’ या अभियानाची सुरवात केली. या अभियानाचा प्रारंभ त्यांनी त्यांच्या मूळ गावी, म्हणजेच हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेतून केला. यावेळी त्यांनी शाळेतील विदारक स्थितीवर आणि सरकारच्या शिक्षण धोरणांवर टीका केली.