अलीकडे प्रत्येक बाबतीत...; वादग्रस्त वक्तव्यावर कोश्यारींचं स्पष्टीकरण

महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक, असंही कोश्यारी म्हणाले आहेत.
Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyarisakal
Updated on

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका विधानामुळे सध्या मोठा गदारोळ माजला आहे. मुंबईतून राजस्थानी आणि गुजराती निघून गेले तर मुंबईत आर्थिक राजधानी राहणार नाही, अशा आशयाचं विधान कोश्यारी यांनी केलं होतं. या वरुन विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. याच विधानावर आता कोश्यारी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून एक निवेदन प्रसिद्ध कऱण्यात आलं आहे. या निवेदनात कोश्यारी म्हणतात की,मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला.

Bhagat Singh Koshyari
"मराठी माणसाला डिवचू नका"; कोश्यारींची होशियारी म्हणत राज ठाकरे संतापले!

राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणतात, "राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही".

Bhagat Singh Koshyari
भाजपा पुरस्कृत CM होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला - संजय राऊत

पण नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे, असंही राज्यपाल कोश्यारी यांनी नमूद केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com