राज्यात 252 तालुक्‍यांत भूजल पातळी खालावली 

राज्यात 252 तालुक्‍यांत भूजल पातळी खालावली 

मुंबई : राज्यातील 252 तालुक्‍यांतील गावांची भूजल पातळी खालावली आहे. ऑक्‍टोबर महिन्यात ही अवस्था असेल, तर पुढील वर्षातील एप्रिल-मे महिन्यापर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागातील जनतेची परवड होणार असून, पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ पडण्याची चिन्हे आहेत. 

मराठवाडा, विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाने म्हणावी तशी हजेरी लावली नाही. तसेच, परतीचा मॉन्सूनही लांबल्याने राज्यातील सर्व प्रकारचे छोटे-मोटे जलाशय भरले नाहीत. पाऊस कमी पडल्याने भूगर्भातील पाण्याची पातळीदेखील कमी झाली असल्याचे समोर आले आहे. या विभागातील विहिरी, नद्या, नाले कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या अखत्यारीत असलेल्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील 13 हजार 984 गावांमधील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. 

पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारीत असलेल्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने राज्यातील विहिरीतील पाणीसाठा तपासण्याचे काम हाती घेतले. या सर्वेक्षणादरम्यान 353 तालुक्‍यांमधील गावांतील पाणीपातळी तपासणी करण्यात आली.

या 353 तालुक्‍यांपैकी 252 तालुक्‍यांतील 13 हजार 984 गावांमधील पाण्याच्या पातळीत 1 मीटरपेक्षा जास्त मागील पाच वर्षांच्या तुलनेत घट झाल्याचे दिसून आले. तर, यापैकी 3 हजार 342 गावांमध्ये 3 मीटरपेक्षा, तर 3 हजार 430 गावांमध्ये 2 ते 3 मीटरपेक्षा घट झाली; तर 7 हजार 212 गावांमध्ये 1 ते 2 मीटर पाण्याच्या पातळीत घट झाल्याचे दिसून आल्याचे त्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

आकडेवारी 

- राज्यातील तालुके - 353 
- भूजल पातळी खालावलेले तालुके - 252 
- भूजल पातळी खालावलेल्या तालुक्‍यांतील गावे - 13 हजार 984 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com