केंद्रीय यंत्रणांचा प्रमाणाबाहेर वापर सुरू - गृहमंत्री

dilip walse patil
dilip walse patilSakal

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी समीर वानखेडे प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय यंत्रणांचा प्रमाणाबाहेर वापर होत असल्याचं त्यांनी म्हटलं. ज्या पद्धतीने एनसीबी कारवाई करत आहे, त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे नवाब मलिक यांनी एसआटीची मागणी केली होती. यावर बोलताना, नवाब मलिकांशी बोलून योग्य ती कारवाई करणार असल्याचं वळसे पाटील यांनी सांगितलं.

गृहमंत्री वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी समीर वानखेडे यांच्या प्रकरणावर जुजबी चर्चा झाल्याचं सांगितलं.

आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे चर्चेचा विषय ठरले आहेत. महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्यावर सतत टीका केल्याने या प्रकरणाला वेगळं वळण लागलं. त्यातच काही संशयास्पद घटनांमुळे आता वानखेडे यांच्यावर खात्यांतर्गत चौकशी लागण्याची शक्यता वाढली आहे. या प्रकरणात प्रभाकर साईलच्या गौप्यस्फोटानंतर समीन वानखेडेंना राज्य सरकारकडून खलनायक ठरवलं जातंय. त्यानंतर गृहमंत्र्यांनी मत व्यक्त केलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com