मुंबई - आहाराची सकसता वाढविण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महिलांमधील ऍनिमियाचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकारने टाटा ट्रस्टच्या सहाय्याने रास्त भाव दुकानातून शिधापत्रिकेवर लोह आणि आयोडिनयुक्त (डबल फोर्टीफाईड) मीठ वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईत मीठवाटप कार्यक्रमाचा प्रारंभ बुधवारी (ता. 31) सकाळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते आणि उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत होणार आहे. सध्या शिधापत्रिकेवर रास्त दरात गहू, तांदूळ आणि तूर डाळ देण्यात येते.
सध्या दिवाळीसाठी शिधापत्रिकाधारकांना एका शिधापत्रिकेवर प्रतिकिलो 20 रुपये या दराने साखर वाटप करण्यात येत आहे. तर, एक किलो चणाडाळ व एक किलो उडीदडाळ किंवा दोन्ही पैकी कोणतीही एक डाळ दोन किलो 35 रुपये किलो दराने या दराने उपलब्ध होत आहे.
|