Jayant Patil : दंगलीमागे कुणाचा कट?, जयंत पाटलांची गृहमंत्र्यांकडे महत्वाची मागणी!

Jayant Patil
Jayant Patil

महाराष्ट्रातील वातावरण चिघळले आहे. अकोला आणि नगरमध्ये देखील दोन गटात गटात राडा झाला. हे प्रकरण शातं होत नाही तोवर नाशिकमध्ये देखील प्रकरण तापले आहे. आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिराच्या घटनेत हिंदू धर्मियांशिवाय इतरांना प्रवेश दिला जात नाही असे नियम आहेत. मात्र तरीही 13 मे रोजी रात्री 9 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास काही व्यक्तींनी उत्तर (महाद्वार) दरवाजाने जबरदस्ती आत जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण तापले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे. दंगलीमागे कुणाचा कट होता हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकर उघड करावं, असे पाटील म्हणाले.

समीर वानखेडे प्रकरणावर देखील जयंत पाटील यांनी भाष्य केले. नवाब मलिक जे माहिती देत होते ती खरी माहिती असल्याचे दिसत आहे.

Jayant Patil
Nashik: जमावाकडून त्र्यंबकेश्र्वर मंदिरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न, नेमका प्रकार काय? सविस्तर जाणून घ्या

जयंत पाटील यांनी ईडी नोटीसवर देखील भाष्य केले आहे. ईडीकडे मी ८ ते १० दिवसाचा वेळ मागितला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीच्या बैठकीबाबत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीत अद्याप जागावाटप ठरले नाही. पुढच्या बैठकीत मित्रपक्षांना बोलवण्यात येणार आहे. तसेच एआयएमआयएस सोबत युतीची कोणतीही चर्चा नाही.

Jayant Patil
IGNOU : जुलै सत्राच्या प्रवेशांना सुरवात ३० जून पर्यंत ऑनलाईन अर्ज; गृहिणी आणि नोकरदारांनाही संधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com