राज्यातील आमदारांसाठी मुंबईत घरे देण्याची घोषणा केल्यानंतर या घोषणेबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे, अनेक जण सरकारच्या या निर्णयावर टीका करत आहेत, सोबतच काही सरकारमधील नेत्यांकडून देखील या निर्णाला विरोध होताना दिसत आहे. काही जणांनी आम्हाला फोफत घर नको असं थेट सांगितलं आहे.
यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी स्पष्टीकरण दिले आहे, तरी काही नेते गोंधळात असल्याचे दिसत आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी मला मोफत घर नको असे म्हणणारे काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddique) यांनी केलेल्या ट्वीटवर खपपूस उत्तर दिलं आहे
“माझ्या वांद्रे पूर्व मतदारसंघात हजारो लोकांना घरं मिळत नसताना आणि ते वाईट अवस्थेत आयुष्य काढत असताना मला महाराष्ट्र सरकारकडून घराची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाडजी यांना माझी विनंती आहे की त्यांनी हा पैसा आमदारांसाठी घरं बांधण्याऐवजी अशा लोकांना घरं बांधून देण्यासाठी वापरावा”, असं ट्वीट झिशान सिद्दिकी यांनी केलं. यावर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना स्पष्टिकरण दिलं आहे.
आव्हाड यांनी त्या ट्विटला रिप्लाय देत लिहीलं आहे की, “तुमच्याकडे कोट्यवधी रुपयांची १० घरं आहेत. पण ही योजना फक्त ग्रामीण महाराष्ट्रातील आमदारांसाठी आहे, मुंबईतील आमदारांसाठी नाही. मला वाटलं तुम्हाला निट कळलं असेल. कुणालाही मोफत घर मिळणार नाही. मला आशा आहे की, आता तरी तुम्हाला हे स्पष्ट झालं असावं”.
आमदारांना अनेक सोयीसुविधा असताना परत घरे कशासाठी असा सूर उमटत आहे. अनेक आमदार कोट्याधीश असून ते मुंबईत घर घेऊ शकतात असे बोलले जात आहे. दरम्यान या आधी देखील म्हाडाच्या घरांसाठी आमदारांना ७० लाख रुपये आकारण्यात येणार असल्याचं, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं होतं
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.