राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. २०१९ चा सत्ताबदल देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी घडवून आणल्याचं सावंत म्हणाले. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल एक ट्वीट केलं आहे. यामध्ये गद्दारी करायची हे आधीच ठरलं होतं, असंही आव्हाड म्हणाले आहेत. तसंच आत्ता हे देतायत ती कारणं खोटी असल्याचं सिद्ध होतं, असंही आव्हाड म्हणाले.
आव्हाड म्हणाले, "आज सत्य समोर आलं. सत्ताबदलामध्ये तानाजी सावंत यांचे काम हे काऊन्सिलिंग आणि मिटिंगचे होते. त्यांनी एकनाथ शिंदेंबरोबर आमदारांचे काऊन्सिलिंग केल्यानंतर १००-१५० बैठका घेतल्या. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर १००-१५० बैठका घेतल्या."
"आमदारांचं मतपरिवर्तन केलं आणि मग सत्ता परिवर्तन झालं. म्हणजे सत्ता परिवर्तनाच्या मागे प्रमुख भूमिका तानाजी सावंत यांची होती हे आज महाराष्ट्राला कळलं. अर्थात गद्दारी करायची हे आधीच ठरले होते आताची देत असलेली कारण खोटी आहेत हेच सिध्द होते."
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.