महाराष्ट्र कोरडा ठेवून मॉन्सूनचा 'रामराम'

Keep the Maharashtra dry the monsoons get Back
Keep the Maharashtra dry the monsoons get Back

पुणे- नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) यंदाच्या हंगामाचा मुक्काम हलवून राज्यातून काढता पाय घेतला आहे. शनिवारी (ता. 6) संपुर्ण राज्यातून मॉन्सून परतल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. 29 सप्टेंबर रोजी राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर मॉन्सूनने देशाच्या बहुतांशी भागातून माघार घेतली आहे. 

यंदाच्या हंगामात 8 जून रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनने 23 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर जवळपास चार महिने मॉन्सूनचे राज्यात अस्तित्व होते. शुक्रवारी निम्म्या महाराष्ट्रातून माघार घेतल्यानंतर शनिवारी संपुर्ण राज्यातून मॉन्सून परतला आहे. सोमवारपर्यंत (ता. 8) मॉन्सून संपुर्ण देशाचा निरोप घेणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यातील बहुतांश भागात गेल्या दीड महिन्यापासून पावसाचा एक थेंबही पडला नाही. आशा असलेला सारा गणेशोत्सवही कोरडा गेला. सध्याचे चित्र पाहिले कुठेही पावसाचा थेंब नाही, राज्यात दुष्काळसदृश परिस्थीती आहे. मराठवाडा, विदर्भ, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पाऊस नसल्याने भयानक परिस्थीती निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com