खरीप हंगाम: 'प्रधानमंत्री पीक विमा योजने'त सहभागासाठी 29 जुलैपर्यंत मुदतवाढ

खरीप हंगाम: 'प्रधानमंत्री पीक विमा योजने'त सहभागासाठी 29 जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : खरीप हंगाम 2019 मध्ये 'प्रधानमंत्री पीक विमा योजने'त राज्यातील सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता यावे, यासाठी 29 जुलैपर्यंत योजनेस मुदतवाढ देण्यात आली, अशी माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे दिली.

योजनेत सहभागी होण्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा अर्ज बँक व `आपले सरकार सेवा केंद्र` (डिजीटल सेवा केंद्र) येथे स्विकारण्यात येत आहेत. तरी शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी विहित मुदतीपूर्वी नजीकची बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावा.

याबाबत अधिक माहितीसाठी विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी तसेच यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com