

Assurance on Farmer Loan Waiver by June 30
Sakal
कोपरगाव : ‘‘ राज्यातील शेतकऱ्यांना ३० जून रोजी कर्जमाफी दिली जाईल. त्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल एप्रिल महिन्यात मिळेल. राज्यात शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार आहे. वेगवेगळ्या योजनांचा अभ्यास करून विकास निधी आणणे, हे सोपे काम नाही. उसाच्या ठिबकसाठी प्रतिटन शंभर रुपये अनुदान देऊन समितीने सरकारच्या पुढे एक पाऊल टाकले,’’ असे प्रतिपादन कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले.