चंद्रपूर : राज्यातील वीज केंद्रांत सध्या कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. चंद्रपूर वीज केंद्रातील परिस्थिती तशी बरी आहे. सातही संच सध्या पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. मात्र, आठ दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा शिल्लक आहे. देशातील अनेक राज्यांत हीच परिस्थिती आहे. केंद्राने याकडे लक्ष देऊन राज्यांना कोळशाचा पुरवठा करण्याचे नियोजन करावे, अशी मागणी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत केली.जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी बुधवारी (ता. १३) चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला भेट दिली. या वेळी श्री. तनपुरे म्हणाले की, कोरोनाची लाट ओसरल्याने सगळे उद्योग आता पूर्णक्षमतेने सुरू झाले आहेत.
यामुळे विजेच्या मागणीत जवळपास आठ ते दहा टक्के वाढ झाली. ज्यांच्यासोबत महावितरण कंपनीचे करार आहेत, तसेच ज्यांच्याशी करार नाही, त्यांच्याकडून एक्स्चेंजधून वाढीव दराने वीज कशी खरेदी करता येईल, या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. अलीकडेच गुजरातमधील एका कंपनीकडून ७०० मेगावॉट वीज घेण्यास सुरुवात केली आहे.२०२० मध्ये शेतकऱ्यांची जवळपास ६० ते ७० टक्के थकबाकीची रक्क्म माफ केली. उर्वरित ३० टक्के रक्कम वर्षभरात भरायची अशी योजना महावितरणने थकबाकीसाठी आणली.
अनेक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला. या तीन महिन्यांत आपण शेतकऱ्यांकडून थकीत बिलाचे पैसे वसूल करणार नाही. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला दुर्गापूर कोळशा खाणीतून कोळशाचा पुरवठा होतो. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे ही खाण तीन-चार महिने बंद राहणार असल्याची माहिती वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे पर्याय शोधावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.