'महाबीज जोमात शेतकरी कोमात'; ऐन खरीपाच्या तोंडावर बियाणांच्या दरात वाढ

ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर महाराष्ट्र बीज निर्माण कंपनी (महाबीज) ने बियाणांच्या दरात मोठी वाढ केली आहे.
Seed
Seedsakal

ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर महाराष्ट्र बीज निर्माण कंपनी (महाबीज) ने बियाणांच्या दरात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं आहे. राज्यभर मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात झाली असून मान्सूनकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. काही दिवसांतच महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाल्यावर शेतकरी पेरण्या आणि लागवडीच्या तयारीला लागणार आहेत.

(Seed Rate Grow)

शेतीच्या मशागतीची लगबग चालू असताना महाबीजने शेतकऱ्यांना धक्का दिला आहे. बियाणांचे दर गगणाला भिडल्याने शेतकऱ्यांची दोन्ही बाजूंनी गळचेपी झाली आहे. महागाई आणि दुष्काळाच्या झळा, काही ठिकाणी अतिरिक्त उसाचा भार तर काही ठिकाणी पीककर्जामुळे होत असलेल्या कोंडीमुळे शेतकरी आर्थिक गर्तेत अडकला असताना महाबीजने बियाणांचे दर वाढवल्याने शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

Seed
'आता हा विषय कायमचाच संपवायचाय'; राज ठाकरेंचं ट्वीट

किती वाढल्या किंमती?

राज्यात सर्वात जास्त मागणी असलेल्या महाबीजच्या सोयाबीनच्या ३० किलोच्या बॅगेत तब्बल २ हजारांनी वाढ झाली आहे. मागच्या वर्षी ७५०० रुपये क्विंटल प्रमाणे मिळणाऱ्या सोयाबीनसाठी यावर्षी १४ हजार ५०० रूपये मोजावे लागणार आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत सोयबीनच्या बियाण्यात क्विंटलमागे ७ हजारांनी वाढ झाली आहे. दरम्यान बाजरीच्या दरात १ हजार रूपयांनी वाढ झाली असून एका क्विंटलसाठी आता १६ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. मक्याचे भाव २ हजारांनी वाढलेले असून एक क्विंटलसाठी २२ हजार रुपये, तुरीच्या भावात १ हजारांनी वाढ झाली असून एका क्विंटलसाठी १७ हजार ५०० रुपये तर मूगाच्या भावात १००० रुपयांनी वाढ होऊन एका क्विंटलसाठी १७ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच खतांच्या भावातही वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान मागच्या वर्षी सोयाबीनच्या बियाणांचा तुटवडा निर्माण झाल्याने सरकारने बाजार समित्यातील सोयाबीन विकत घेतले आणि पिशव्यात भरून शेतकऱ्यांनी बोगस बियाणे वाटले आहे असा आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला होता. दरम्यान या दरवाढीवर महाबीज प्रशासनाने माध्यमांना बोलायला नकार दिला आहे.

का वाढल्या किंमती ?

महाबीजकडे बियाणांचा साठा कमी असल्याने या किंमती वाढल्या असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या महाबीजचं फक्त ४२ हजार क्विंटल बियाणं बाजारात आलं आहे. हे बियाणे मागणीपेक्षा खूप कमी असल्याचं सांगितलं जातंय म्हणून सध्या बियाणांचे भाव गगणाला भिडल्याचं सांंगण्यात येत आहे.

दरम्यान चार वर्षापूर्वी महाबीजकडे उपलब्ध असलेल्या बियाणांचा आकडा हा साडेपाच लाख क्विंटल इतका होता पण दरवर्षी शेतकऱ्यांना ११ लाख क्विंटल बियाणांची आवश्यकता असते. त्यातील ६ ते साडेसहा लाख क्विंटल बियाणे हे महाबीजचे असते असं समोर आलं आहे. पण लगाणाऱ्या ११ लाख क्विंटल बियाणांपैकी महाबीजकडे फक्त ४२ हजार क्विंटल बियाणं उपलब्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com