मुंबई - मंदीच्या वातावरणातही राज्यातील शेतकऱ्यांना, तसेच सर्व वर्गांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आम्ही सादर केला असून, शिक्षण, आरोग्य, पर्यटन या सर्व विभागांना न्याय देण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी कर्ज देताना आता रकमांचे उद्दिष्ट न ठेवता अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभार्थी करावे, ही विनंती करण्यासाठी आपण दिल्लीला जाणार असल्याचेही अजित पवार म्हणाले.
मराठवाड्याला अर्थसंकल्पात काहीही दिले नाही, या विरोधकांच्या आरोपाचा इन्कार करताना पवार म्हणाले, की यासाठी तरतूद केली आहेच. प्रथम औरंगाबाद, लातूर, जायकवाडी, उजनी या टप्प्यात ग्रीडचे काम केले जाईल. उद्योगांना उद्योगांना स्वस्त दरात वीज दिली जाणार असल्याने राज्यात उद्योगांचे आगमन होईल. महाराष्ट्रात या पूर्वी राबविल्या गेलेल्या पण बंद पडलेल्या जलसंधारण योजनांच्या पुनरुज्जीवनासाठी सुरू केलेली योजना म्हणजे ‘जलयुक्त शिवार’चे पुनरुज्जीवन नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘विदर्भ, मराठवाड्यावर अन्याय’
‘राज्यातील महाविकास आघाडीने अर्थसंकल्प सादर केला नसून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभेतले जाहीर भाषण केले आहे. या अर्थसंकल्पातील सर्व काही केवळ दोन जिल्ह्यांसाठी असून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रावर या अर्थसंकल्पाने अन्याय केला असल्याची प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
‘त्रिघाडीच्या सरकारने मागास भागावरील अन्यायाची मालिका पुढे चालू ठेवली आहे. पेट्रोल डिझेलवरील करवाढ ही महागाई वाढवणारी आहे. मराठवाड्यातील दुष्काळाचा प्रश्न सोडवण्यासाठी वॉटर ग्रीडची 20 हजार कोटींची योजना आम्ही मांडली होती.
त्यासाठी केवळ 200 कोटींची तरतूद केली आहे. आत्महत्याग्रस्त भागात शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या योजनांना निधी नाही, केंद्र सरकारच्या योजना या आपल्याच आहेत असे सांगत त्यांचा साधा उल्लेखही न करता त्या आपल्याच नावाने रेटणाऱ्या योजनांनी अर्थसंकल्प सजवला गेला आहे,’ अशी टीका फडणवीस यांनी केली.
ते म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीची आमची योजना आज सरकारमध्ये असलेल्या नेत्यांनी हास्यास्पद ठरवली होती. आज मुदत कर्जाचा विचारही न करता कर्जमाफी दिली जाते आहे. प्रशिक्षणार्थी निर्माण करणारी योजना राज्यात सुरू आहे , सरकार तीच मांडत असून मुख्यमंत्री जलसंधारण योजना म्हणजे जलयुक्त शिवार योजनेचे नवे नाव आहे. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धोरणशून्य अर्थसंकल्पात तिन्ही पक्षांनी आपापले जाहीरनामेही पूर्ण केलेले नाहीत, असा आरोप केला. पहिल्या वर्षी 10 लाख मुलींना लॅपटॉप देण्याचे आश्वासन गेले कुठे ? असा प्रश्नही त्यांनी केला. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी, कोकणासारख्या मागास भागाचा विचार झालेला नाही, असा अारोप केला.
अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी
कृषी -
उद्योग -
रस्ते व वाहतूक -
पाणीपुरवठा व स्वच्छता -
इमारत बांधणी -
वसतिगृहांना, मंडळांना निधी -
अल्पसंख्याकांसाठी तरतूद -
आरोग्य सेवा -
पर्यटन विकास -
पर्यावरण व वने -
शिक्षण -
सामाजिक सेवा -
इतर -
विविध सवलती -
आणला मी उद्याचा सूर्य येथे लावती काही करंटे सांजवाती || या कवी सुरेश भट यांच्या कवितेच्या ओळी सादर करून अजित पवार यांनी अर्थसंकल्पाचा शेवट केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.