पुणे : महाराष्ट्र हे छत्तीसगड, नागालॅंड आणि झारखंड या तीन राज्यांच्या पाठोपाठ देशातील सर्वाधिक ग्रामीण दारिद्र्य असलेले राज्य आहे. राष्ट्रीय नमुना सर्व्हेक्षण संघटनेच्या (एनएसएसओ) आकडेवारीवरून हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे..‘एनएसएसओ’ने २०२२-२३ मध्ये केलेल्या सर्व्हेक्षणाची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार अखिल भारतीय पातळीवर ग्रामीण दारिद्र्याचे प्रमाण ६.४१ टक्के आहे. महाराष्ट्रात ग्रामीण दारिद्र्याचे प्रमाण ९.५५ टक्के आहे. उत्तर प्रदेशात हे प्रमाण ६.८० टक्के आहे, तर बिहारमध्ये ६.३५ टक्के आहे, याचा अर्थ उत्तर प्रदेश, बिहार या दोन्ही राज्यांत ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी दारिद्र्य आहे. महाराष्ट्रापेक्षा जास्त ग्रामीण दारिद्र्य फक्त नागालॅंड, छत्तीसगड, झारखंड याच राज्यांत आहे. ओडिशासुद्धा महाराष्ट्राच्या पुढे निघून गेला आहे..सुमारे दहा वर्षांपूर्वी म्हणजे २०११-१२ मध्ये केलेल्या सर्व्हेक्षणामध्ये महाराष्ट्राची कामगिरी तुलनेने चांगली होती. तेव्हा अखिल भारतीय पातळीवर ग्रामीण दारिद्र्याचे प्रमाण २५.७ टक्के होते, तर महाराष्ट्रात हे प्रमाण २४.२२ टक्के होते. तसेच ग्रामीण महाराष्ट्राची स्थिती उत्तर प्रदेश, बिहारपेक्षा चांगली होती. कर्नाटकात सुद्धा महाराष्ट्रापेक्षा थोडी जास्त गरिबी (२४.५३ टक्के) होती. आसाम, बिहार, छत्तीसगड, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, मिझोराम, ओडिशा, उत्तर प्रदेश या सगळ्या राज्यांत महाराष्ट्रापेक्षा ग्रामीण दारिद्र्य अधिक होते..गेल्या दहा-बारा वर्षांत ग्रामीण दारिद्र्याच्या बाबतीत महाराष्ट्राची मोठी घसरण झाली असून, आर्थिक धोरणातील ढोबळ चुका त्यासाठी कारणीभूत आहेत, असे मत प्रख्यात अर्थतज्ज्ञ प्रा. नीरज हातेकर यांनी व्यक्त केले. कापूस, सोयाबीन, ऊस आणि भात या चार प्रमुख पिकांबाबतची चिंताजनक परिस्थिती, शेतीमालाला मिळणारा कमी भाव आणि त्यामुळे शेतमजुरीचा कमी दर आदी घटक या अधोगतीला जबाबदार आहेत, असे ते म्हणाले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
पुणे : महाराष्ट्र हे छत्तीसगड, नागालॅंड आणि झारखंड या तीन राज्यांच्या पाठोपाठ देशातील सर्वाधिक ग्रामीण दारिद्र्य असलेले राज्य आहे. राष्ट्रीय नमुना सर्व्हेक्षण संघटनेच्या (एनएसएसओ) आकडेवारीवरून हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे..‘एनएसएसओ’ने २०२२-२३ मध्ये केलेल्या सर्व्हेक्षणाची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार अखिल भारतीय पातळीवर ग्रामीण दारिद्र्याचे प्रमाण ६.४१ टक्के आहे. महाराष्ट्रात ग्रामीण दारिद्र्याचे प्रमाण ९.५५ टक्के आहे. उत्तर प्रदेशात हे प्रमाण ६.८० टक्के आहे, तर बिहारमध्ये ६.३५ टक्के आहे, याचा अर्थ उत्तर प्रदेश, बिहार या दोन्ही राज्यांत ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी दारिद्र्य आहे. महाराष्ट्रापेक्षा जास्त ग्रामीण दारिद्र्य फक्त नागालॅंड, छत्तीसगड, झारखंड याच राज्यांत आहे. ओडिशासुद्धा महाराष्ट्राच्या पुढे निघून गेला आहे..सुमारे दहा वर्षांपूर्वी म्हणजे २०११-१२ मध्ये केलेल्या सर्व्हेक्षणामध्ये महाराष्ट्राची कामगिरी तुलनेने चांगली होती. तेव्हा अखिल भारतीय पातळीवर ग्रामीण दारिद्र्याचे प्रमाण २५.७ टक्के होते, तर महाराष्ट्रात हे प्रमाण २४.२२ टक्के होते. तसेच ग्रामीण महाराष्ट्राची स्थिती उत्तर प्रदेश, बिहारपेक्षा चांगली होती. कर्नाटकात सुद्धा महाराष्ट्रापेक्षा थोडी जास्त गरिबी (२४.५३ टक्के) होती. आसाम, बिहार, छत्तीसगड, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, मिझोराम, ओडिशा, उत्तर प्रदेश या सगळ्या राज्यांत महाराष्ट्रापेक्षा ग्रामीण दारिद्र्य अधिक होते..गेल्या दहा-बारा वर्षांत ग्रामीण दारिद्र्याच्या बाबतीत महाराष्ट्राची मोठी घसरण झाली असून, आर्थिक धोरणातील ढोबळ चुका त्यासाठी कारणीभूत आहेत, असे मत प्रख्यात अर्थतज्ज्ञ प्रा. नीरज हातेकर यांनी व्यक्त केले. कापूस, सोयाबीन, ऊस आणि भात या चार प्रमुख पिकांबाबतची चिंताजनक परिस्थिती, शेतीमालाला मिळणारा कमी भाव आणि त्यामुळे शेतमजुरीचा कमी दर आदी घटक या अधोगतीला जबाबदार आहेत, असे ते म्हणाले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.