संजय राऊत तुम्ही शिवसेनेची वाट लावली, आतातरी थांबा : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil
Chandrakant Patil

मुंबई : संजय राऊत यांनी आतातरी बोलणे बंद करावे. शिवसेनेची वाट लावली. संजय राऊत यांच्या तोंडात ही भाषा शोभत नाही. पाठीत खंजीर खुपसण्याची भाषाण त्यांना शोभत नाही. उद्धव ठाकरेंनी आता त्यांना आवरावे. आम्ही मातोश्रीवर जात होतो. मात्र, त्यांना सिल्व्हर ओकवर किंवा हॉटेलवर जावे लागले, असे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
 
राजभवनात आज (शनिवार) सकाळी आठ वाजता राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, की 24 नोव्हेंबरला महाराष्ट्राचे निकाल लागले. महायुतीला जनादेश दिला होता. परंतू, या जनादेशाचा शिवसेनेने अपमान केला. अडीच वर्षांचे पहिल्या दिवसापासून सुरु केले. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटत राहिली. पण, त्यांना भाजपला भेटायला वेळ नव्हता. शेवटी भाजप सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरले. महाराष्ट्रातील जनता त्रस्त आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडले, सावरकरांना भारतरत्न देण्याची भूमिका सोडली, तसेच त्यांनी शिव नाव सोडले. सर्वांत जास्त जागा मिळाल्याने आम्हीच सरकार स्थापन करावे, असे सगळ्यांचे मत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com