

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis
esakal
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका याचिकेवरील सुनावणीवेळी एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. आज सुरु असलेल्या मतदानाचा निकाल आता २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. यावरून आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. हे मुळात व्यवस्थेचं अपयश आहे, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.