दिलासादायक; राज्यात दिवसभरात 15 हजार रुग्ण; 184 मृत्यू

Corona
CoronaMedia Gallery

मुंबई- राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या 20 हजारांच्या खाली नोंदली गेली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात १५ हजार ०७७ रुग्णांची नोंद झाली आहे, तर ३३ हजार ००० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५३ लाख ९५ हजार ३७० करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.८८% एवढे झाले झाले. सध्या राज्यात कोरोनाचे 2 लाख 53 हजार 367 सक्रिय रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

राज्यात दिवसभरात १८४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे ही दिलासादायक बातमी आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६६% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ५० लाख ५५ हजार ०५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७ लाख ४६ हजार ८९२ (१६.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८ लाख ७० हजार ३०४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर १० हजार ७४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com