

'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६' या कायद्याबातची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, दि. २८ ऑगस्ट २०२६, रक्षाबंधनाच्या दिवसापासून या कायद्याची अंमलबजावणी होईल. हा कायदा विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मंजूर करुन घेण्यात आलेला आहे. जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्यांविरोधात नवीन कायद्यानुसार गुन्हा दाखल होईल.