Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Maharashtra Fishing Ban: महाराष्ट्र सरकारने सागरी मासेमारीवरील वार्षिक बंदीचा कालावधी ६१ दिवसांवरून ७६ दिवसांपर्यंत वाढवला आहे. १ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत लागू होणाऱ्या या बंदीमुळे सागरी जैवविविधता आणि माशांच्या उत्पादनात वाढ होईल.
Maharashtra Fishing Ban

Maharashtra Fishing Ban

ESakal

Updated on

महाराष्ट्र सरकारने सागरी मासेमारीवरील वार्षिक बंदीचा कालावधी १५ दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतला असून, आता ही बंदी १ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत लागू असेल. यापूर्वी ही बंदी १ जून ते ३१ जुलै या ६१ दिवसांच्या कालावधीसाठी लागू होती. या नवीन निर्णयामुळे मासेमारी बंदीचा एकूण कालावधी ७६ दिवसांवर पोहोचला आहे. राज्यभरातील मच्छिमार आणि त्यांच्या संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com