

Devendra Fadnavis
esakal
नागपूर: ‘‘राज्यात यापूर्वीच्या कर्जमाफीत आधीच्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा सामील केले गेले नव्हते. मात्र, या वेळी मागील कर्जमाफीत लाभ मिळालेल्यांनाही संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी सत्तारूढ आमदारांची मागणी होती. त्यामुळेच आम्ही यंदा पूर्ण कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कर्जमाफी ठरेल,’’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.