गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा तापला आहे.
कोल्हापूर : बेळगाव जिल्ह्यात मराठी भाषिकांचं प्राबल्य असतानाही बेळगावला महाराष्ट्रापासून तोडल्यामुळं येथील जनतेच्या भावना तीव्र आहेत. गेल्या पन्नास वर्षांपासून बेळगांवची जनता महाराष्ट्रात सामील होण्यासाठी झगडत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा सीमावादाचा मुद्दा चिघळू लागला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील सीमावादाचा (Maharashtra-Karnataka Border Dispute) मुद्दा तापला आहे. त्यातच आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) हे आज (रविवार) बेळगाव (Belgaum) दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी संभाजीराजे छत्रपतींना कर्नाटक सरकारनं (Karnataka Government) वाय प्लस सुरक्षा दिलीये.
संभाजीराजे छत्रपतींनी कर्नाटक राज्याच्या हद्दीत प्रवेश केल्यापासून ते कर्नाटक राज्याच्या हद्दीतून बाहेर जाईपर्यंत त्यांना कर्नाटक सरकारच्या वतीनं वाय प्लस सुरक्षा देण्यात आलीये. सुरक्षेच्या कारणास्तव संभाजीराजे छत्रपतींना कोणतीही अडचण येणार नाही याची खबरदारी कर्नाटक सरकारनं घेतलीये. दरम्यान, संभाजीराजेंना याबाबत कर्नाटक पोलिसांकडून (Karnataka Police) फोन आला होता. वाय प्लस सुरक्षा देणार असल्याचं यावेळी संभाजीराजेंना पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.