नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीचे युनिट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या गंभीर प्रकरणानंतर हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. या कंपनीतील कामगारांना मुंबई आणि पुण्यातील इतर प्रकल्पांमध्ये सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू असून सध्या कर्मचाऱ्यांना कंपनीत येण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलीस तपास सुरू असल्यामुळे केवळ काही ठराविक व्यक्तींनाच कंपनी परिसरात येण्याची परवानगी दिली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.