Raj Thackeray Warning on Mumbai BMC Election
esakal
महाराष्ट्र बातम्या
Raj Thackeray : रात्र वैऱ्याची, गाफील राहू नका! मुंबई मनपाची ही शेवटची निवडणूक, त्यानंतर...; राज ठाकरेंचा थेट इशारा
Raj Thackeray Warning on Mumbai BMC Election : राज ठाकरे यांनी मनसेच्या कोकण महोत्सवाला हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी बोलताना, मुंबई महापालिकेची निवडणूक ही शेवटची निवडणूक असेल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यानुसार सुरुवातीला २४६ नगर परिषद आणि ४२ नगर पंचायतांसाठी निवडणूक होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या निवडणूक होईल, अशी माहिती आहे. या निवडणुकांच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यापार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप आणि टीका टिप्पणी केली जाते आहे.
