धाराशिव शहरातील ₹140 कोटी निधीवरून सुरू झालेला वाद थांबायचं नाव घेत नाही.या कामामुळे महायुतीत वादाचा भडका उडाला आहे. शिवसेना आणि भाजप आमने-सामने आलेत. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंखे यांनी या कामांमध्ये मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांचे गंभीर आरोप केले आहेत.तर जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी महायुतीत भाजप शिवसेनेला विचारात घेत नसल्याचा आरोप करत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा जाहीर निषेध केला. त्यामुळे महायुतीतला वाद वाढण्याची चिन्ह आहेत.