करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्याच्या जतन व संवर्धनाचे काम अखेर पूर्ण झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेली ही प्रक्रिया काल यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. दरम्यान, पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंदिरात येऊन देवीच्या मूळ मूर्तीची सविस्तर पाहणी केली तसेच गाभाऱ्यात करण्यात आलेल्या संवर्धनाच्या कामाचीही तपासणी केली. मंगळवारी दिवसभर गाभारा संवर्धनाचे काम सुरू होते. आज पहाटे चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास प्राणप्रतिष्ठापनेचा होम करण्यात आला. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता अभिषेक पार पडणार असून आरतीनंतर भाविकांसाठी देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन पूर्ववत सुरू होणार आहे.