Latest Marathi News Live Update
esakal
महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने मुंबईत स्वबळावर निवडणूक लढविण्याचा अंतिम निर्णय शनिवारी टिळक भवन येथे झालेल्या पक्षाच्या आढावा बैठकीत घेण्यात आला. मात्र, मुंबई वगळता इतर ठिकाणी समविचारी पक्षांशी, ‘इंडिया’च्या घटक पक्षांशी चर्चा सुरू असून, आवश्यकता असेल तेथे भाजप महायुती सोडून अन्य समविचारी पक्षांशी आघाडीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.