गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांचा घास हिरावला. नवापूर तालुक्यातील खेकडा झामणझर परिसरात भात शेतीच प्रचंड नुकसान झालं आहे. सोमवेल कुवर या शेतकऱ्यांचे तोडणीवर आलेली भात शेती पाण्यात वाहून गेलीय. खेकडा झामणझर गावातील शेतकऱ्याने लावलेल्या चार ते पाच एकर भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.