नाशिकमध्ये २५५ कुटुंबांचा हिंदू धर्मात पुनर्प्रवेश झाल्याची माहिती समोर आली आहे. या कार्यक्रमाला रामानंद नरेंद्राचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती. मुलांना इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून धर्मांतर करण्यात आल्याचा दावा नरेंद्राचार्य यांनी केला आहे. तसेच अंधश्रद्धा आणि अज्ञानाचा फायदा घेऊन काही ठिकाणी धर्मांतर घडवून आणल्याचाही आरोप त्यांनी केला. याशिवाय काही लोक धर्मांतराच्या माध्यमातून सुप्त राजकारण करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.