राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलंय. यावरच आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलंय. आमचे नेते वर्षावर अर्थखात्यासाठी गेले असतील असं समजू शकतो. पण जयंत पाटील तिथं गेले म्हणजे राजकारणात काहीतरी ट्विस्ट आहे. शिवाय सर्वच गोष्टी अकल्पित असून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वरच्या पातळीवर काय घडतंय याचा थांगपत्ताही नसतो असं त्यांनी म्हटलं.