
Babasaheb Patil Explains Statement on Farmers and Loan Waiver
Esakal
Babasaheb Patil: शेतकऱ्यांबाबत राज्यातले नेते, मंत्री आणि खुद्द कृषी खात्याचे मंत्रीही संवेदनशील नसल्याचं आतापर्यंत अनेकदा समोर आलंय. कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांबाबत सभागृहात चर्चेवेळी तत्कालीन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे गेम खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामुळे त्यांना कृषी खात्या ऐवजी क्रीडा खातं सोपवण्यात आलं. आता राज्याचे विद्यमान सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी वादग्रस्त विधान केलंय. राज्यातल्या लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. निवडणुकीच्या काळात राजकारणी काहीही आश्वासनं देतात असं बाबासाहेब पाटील म्हणाले होते. या विधानावरून टीका सुरू होताच आता मंत्री बाबासाहेब पाटील यांनी युटर्न घेतलाय.