
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फटकारल्यानंतरही महायुती सरकारमधील मंत्र्यांची वादग्रस्ते थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि विधिमंडळा पत्ते खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांना कृषीमंत्रीपद सोडावे लागल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या एका वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.