मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. काल (सोमवार, 11 नोव्हेंबर) रात्री राज्यपालांनी तिसऱ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केलं. राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी मुदत देण्यात आली. पण, बहुमतासाठी पुरेसे संख्याबळ नसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आपली संपूर्ण ताकद पणाला लावावी लागणार आहे.
काय घडलं काय घडणार?
राज्यपालांची भूमिका निर्णायक
राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्षही सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरल्यामुळं राष्ट्रपती राजवटी शक्यता बळावली आहे, असं कायदे तज्ज्ञ सुभाष कष्यप यांनी व्यक्त केले आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये राज्यपाल भगतसिंग कोशियार यांची भूमिका निर्णायक आहे. त्यांना कलम 172नुसार वेळेची मर्यादा नाही. पंरतु, जर तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष राष्ट्रवादीही सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरला तर, मग राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता जास्त असल्याचे मत कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी व्यक्त केले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.