
राज्याला लवकरच तिसरा मुख्यमंत्री मिळणार आहे आणि तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतीलच असणार आहे. यासाठी पडद्यामागे हालचाली सुरु आहेत, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदेनी पालकमंत्रीपदाचा वाद सोडवावा. ते आधी मुख्यमंत्री होते, नंतर उपमुख्यमंत्री झाले, उद्या ते ही राहणार नाहीत, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला.