मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या गोटात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे अडीच वर्ष चाललेल्या महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. भाजपची सत्ता येण्यासाठी केंद्र सरकारच्या सक्तवसुली संचालनालय (ED), प्राप्तीकर विभाग (IT) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाची (CBI) मदत झाल्याचा आरोप विरोध पक्षांकडून केला जात आहे. (Maharashtra Politics How Much Each Laddu, Ask Congress Leader Srinivas BL To BJP)
दुसरीकडे भाजपच्या (BJP) नेत्याकडून अनैसर्गिक आघाडीचे सरकार गेले, नव महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) करतील, असे वेगवेगळे दावे केले जात आहे. या सर्व घडामोडींवर भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही यांनी ट्विट करुन टीका केली आहे. प्रत्येक लाडूची किंमत ५० ते १०० कोटी आहे, असा सवाल श्रीनिवास यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपला केला. यात सक्तवसुली संचालनालय, प्राप्तिकर विभागाचा (IT) मेहनतानाचा समावेश नाही, असे ते म्हणाले. (Maharashtra Politics)
या पोस्टबरोबर श्रीनिवास बी.व्ही यांनी एक छायाचित्र शेअर केले आहे. छायाचित्रात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देवेंद्र फडणवीस यांना पेढा भरवत आहेत. यावेळी पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.